छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काल सदृश्य़ परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जायकवाडी धरणात फक्त ४७ टक्के पाणीसाठी उरलेला असून सध्या मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांत ९५ टक्केसाठी उपलब्ध असून या धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी प्रशांत बंब यांनी धरण प्रशासनाकडे केली आहे. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यात पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यावरून प्रशांत बंब यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचं मुख्य कामांकडे दुर्लक्ष,” आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी
माननीय मंत्री महोदय गेल्या ४० वर्षापासून राजकारण करीत आहेत अन् ते अशा पद्धतीचे ठराव घेत असल्याचं माझ्या मनाला पटत नाही. परंतु याप्रकरणाबाबतची पक्षाकडे गंभीर तक्रार करणार आहे. कारण एक मंत्री विभागा विभागामध्ये भांडणं लागतील असे ठराव मंजूर करीत आहेत. असं प्रशांत बंब यांनी म्हटलंय.
हेही वाचा…बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राडा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
इकडे पाणी न सोडण्याचा ठराव नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विखे पाटील यांनी घेतला आहे. तर याचा असा अर्थ होतो की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करा. परंतु आमचं सरकार घटनेनुसार चालत आहे. परंतु मराठवाड्यात असा गंभीर दुष्काळ होत असतांना पालकमंत्री असा ठराव मांडत आहेत. हे एकदम दुर्दैवी आहे. असंही प्रशांत बंब यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग, फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाचा विरोध
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?
हेही वाचा…“आज बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं असतं”, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान