बीड : गोपीनाथ मुंडे असते तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. असे मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जालन्यात झालेल्या ओबीसी एल्गार सभेत म्हटले होते. कालच्या सभेत सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर आले होते. परंतु भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या नव्हत्या. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
पक्षाने या सभेला कोणी जायचे हे ठरविले होते आणि आजचं भाषण छगन भुजबळ यांचं होतं म्हमून मी या ठिकाणी गेले नाही. तसेचही बहुजनांच्या संघर्षासाठी निमंत्रणाची,मानपानाची गरज नाही. मी माझी ओबीसी आरक्षणावर भूमिका आधीच मांडलेली आहे. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचं मुख्य कामांकडे दुर्लक्ष,” आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी
दरम्यान, जालन्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेसाठी छगन भुजबळ यांच्यासह विजय वडेट्टवारी, आशिष देशमुख, गोपीचंद पडळकर, आदि नेते उपस्थित होते. एल्गार सभेतून ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपापली बाजू मांडली तर भुजबळांनी या सभेतून मनोज जरांगे पाटलांवर जोरदार घणाघात केला.
READ ALSO :
हेही वाचा…सरकारमधीलच मंत्री अन् आमदारामध्ये शाब्दिक चकमक, पक्ष श्रेष्ठींकडे भाजप आमदार तक्रार मांडणार
हेही वाचा…पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग, फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाचा विरोध
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?
हेही वाचा…“आज बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं असतं”, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना