बीड : गोपीनाथ मुंडे असते तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. असे मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जालन्यात झालेल्या ओबीसी एल्गार सभेत म्हटले होते. कालच्या सभेत सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर आले होते. या सभेला पक्षाने मला पाठवलं नाही. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. त्यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक
मेळाव्यासाठी पाठवलं हे आम्हाला माहित नाही. याची मला कल्पना नाही. तो पंकजा मुंडे यांचा दावा आहे. त्यांनी त्या सभेला जायचं की नाही हा त्यांचा अधिकार होता. त्या समाजाच्या मोठ्या नेत्या आहेत. पंकजाताई नाराज असल्याच्या वावड्या नेहमीच उठवल्या जातात. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करता कामा नये. असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?
पक्षाने या सभेला कोणी जायचे हे ठरविले होते आणि आजचं भाषण छगन भुजबळ यांचं होतं म्हमून मी या ठिकाणी गेले नाही. तसेचही बहुजनांच्या संघर्षासाठी निमंत्रणाची,मानपानाची गरज नाही. मी माझी ओबीसी आरक्षणावर भूमिका आधीच मांडलेली आहे. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर रोखलं, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झाली बाचाबाची
हेही वाचा…एल्गार सभेनंतर मराठा समाज आक्रमक, भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
हेही वाचा…सरकारमधीलच मंत्री अन् आमदारामध्ये शाब्दिक चकमक, पक्ष श्रेष्ठींकडे भाजप आमदार तक्रार मांडणार
हेही वाचा…पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग, फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाचा विरोध