मुंबई : आदित्य ठाकरे यांच्याकडून गुरूवारी लोअर परळमधील पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केलं. दिवाळीपुर्वी डिलाईन रोडवरील संपूर्ण पुल सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी होती. त्यानंतर पुल खुला न झाल्यानं आदित्य ठाकरे यांच्याकडून गुरूवारी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. यातच आता मुंबई पालिकेच्या तक्रारीनंतर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांत आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग, फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाचा विरोध
लोअर परळच्या पुल उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. विकासकामे पुर्णे झाल्यावर रितसर शासनाच्या नियमानुसार करण्याची संहिता असते, कायदा हातात घेऊन वातावरण खराब करणाऱ्यांवर झालेली कारवाई योग्यच असल्याची टिका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक
दरम्यान, मुंबईतील लोअर परेल पुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. लोअर परळ पुलाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे यांच्यावर केला असून एकूण चार कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुलाची स्थिरता चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांच्याकडून पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?
पालिकेने दाखल केलेल्या तक्रारीत कलम १४३ अंतर्गत बेकायदेशीर जमाव करणे, कलम १४९ समान उद्दिष्ट साधण्यासाठी जमाव जमवणे, कलम ३३६ लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे,कलम ४४७ गुन्हेगारी उद्देशाने अतिक्रमण करणे, इत्यादी कलमांतर्गत आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ओबीसींच्या सभेला पक्षाने पाठवलं नाही,” पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर रोखलं, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झाली बाचाबाची
हेही वाचा…एल्गार सभेनंतर मराठा समाज आक्रमक, भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
हेही वाचा…सरकारमधीलच मंत्री अन् आमदारामध्ये शाब्दिक चकमक, पक्ष श्रेष्ठींकडे भाजप आमदार तक्रार मांडणार