मुंबई : महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाकरीता संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ घेण्याबाबत आज ठाकरे गटातील शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटातील खासदार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा समावेश होता.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच, मुंबईत गुन्हा दाखल, भाजप नेत्याने डिवचलं
मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात मराठा तसेच धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करावी आणि आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यासाठीच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत. अरविंद सावंत. अनिल देसाई, राजन विचारे, संजय जाधव, प्रियांका चतुर्वेदी, ओम राजे निंबाळकर, अंबादास दानवे, अजय चौधरी, अनिल परब आणि सुनिल प्रभू यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.
हेही वाचा…“ओबीसींच्या सभेला पक्षाने पाठवलं नाही,” पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जी @rashtrapatibhvn यांची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महाराष्ट्रात निर्माण झालेल्या गंभीर सामाजिक समस्येचे संविधानिक पद्धतीने निराकरण करण्याची विनंती केली.
महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाच्या… pic.twitter.com/KZqU8hEB5S— Arvind Sawant (@AGSawant) November 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही”, भाजप नेत्याची टिका
हेही वाचा…“संभाजी राजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत,”,छगन भुजबळांनी संभाजी राजेंना सुनावलं
हेही वाचा…मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतली सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा…“तर प्रत्येक व्यक्तीने विष घेऊन मेलेलं बरं,” जरांगे पाटलांच्या भेटीनंतर उदयन राजेंचं मोठं विधान
हेही वाचा…“मुंबईकरांचा पाणी होणार महाग, पाणी पट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ,” काॅंग्रेसचा प्रचंड विरोध