अमरावती : अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री आणि बंडखोर आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. यासंदर्भात रवी राणा आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तर या प्रकरणावर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. असली मंत्रिपद ओवाळून टाकतो. एक तारखेला ट्रेलर तर पंधरा दिवसात पिक्चर दाखवणार असंही त्यांनी म्हटलं आहे.
“केंद्रातील लाड पुरवता पुरवता भाजप महाराष्ट्राला भिकेला लावणार”
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर बोलताना म्हटलं आहे की, कुठल्याही राजकीय पक्षातील नेत्यांनी बोलण्यासाठी अचारसंहिता पाळली पाहिजे. ते नेहमी म्हणत आहेत, की बच्चू कडू यांनी खोके घेतले आहेत. ते नेहमी आमची बदनामी करीत आहेत. मग रवी राणा मंत्रीपदाच्या रांगेत कसे लागतात. तसेच ज्याच्या घरी जेवण करायचं त्याच्याच घरावर ताट फेकून मारायचं असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार
तसेच बच्चू कडू मंत्रिपदासाठी आग्रही आहे. या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, अशा मंत्रिपदासाठी बच्चू कडू चोमड्या नाही. अशी मंत्रिपद ओवाळून टाकतो. तसेच आम्ही मैदानात उतरू तेव्हा आमदारकीचा राजीनामा घेऊनच उतरू. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी 1 नोव्हेंबर पर्यंत रवी राणा यांना खोके घेतल्याचा पुरावा देण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर राज्यात पिक्चर दाखवणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also
- “राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरक्षा कपात करून दडपण आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न”
- “अन् ठाकरेंचं नाव काढून त्याठिकाणी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं”; अजित पवार
- “कोणत्याही पदावर नसलेल्या राणांना सुरक्षा अन् माझी सुरक्षा काढली”; विजय वडेट्टीवार
- “कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही”
- “केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवताहेत”