मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यामध्ये पवार आणि ठाकरे कुटुंबीय वगळता आघाडीतील महत्वाच्या नेत्याची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यावरून आता राज्यात एकच चर्चा रंगली आहे. यावर आता काॅंग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार
महाराष्ट्रात गैरसंविधानिक मार्गाने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा संवैधनिक खटका अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थिती विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा काढणे. म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा कुटील प्रयत्न शिंदे सरकार करीत आहे. असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी म्हटंल आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे
पुढे बोलताना ते म्हणाले की, तसेच जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत कपात करून शिंदे सरकार राष्ट्रवादीवर दडपण आणण्याचा प्रयत्न शिंदे सरकार कदाचित करीत असेल. मात्र सुरक्षा काढली आणि आम्ही घरी बसू असा गौड समज जर शिंदे सरकारचा विचार असेल तर तो पुर्णपणे चुकीचा आहे. उलट अधिक जोमाने आम्ही शिंदे सरकारचा विरोध करणार आहोत. येत्या 4 आणि 5 नोव्हेंबरला होणाऱ्या शिर्डी येथे शिबिरामध्ये राष्ट्रवादी शिंदे सरकारला घेरण्याचा रणनीती करणार आहे. असंही त्यांंनी म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”
दरम्यान, केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते. मात्र मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा काढल्यामुळे नक्षलग्रस्त भागात मी करत असलेले काम किंवा दौरे कमी होणार नाही. मात्र लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यापुर्वी राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता. असं विजय वडेड्डीवार यांनी म्हटंल आहे.
Read also
- “अन् ठाकरेंचं नाव काढून त्याठिकाणी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं”; अजित पवार
- “कोणत्याही पदावर नसलेल्या राणांना सुरक्षा अन् माझी सुरक्षा काढली”; विजय वडेट्टीवार
- “कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही”
- “केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवताहेत”
- “केंद्रातील लाड पुरवता पुरवता भाजप महाराष्ट्राला भिकेला लावणार”