मुंबई : गेल्या 75 वर्षात असं कधीच घडलं नाही. काॅंग्रेसमध्येही फुट पडली होती. तेव्हा त्यांचं चिन्ह गोठवलं होतं. तसेच समाजवादी पार्टीतही अशी परिस्थिती झाली होती. समाजवादी पार्टीचं चिन्ह दुसऱ्या गटाला दिलेलं नव्हतं. तसेच जयललीता यांच्याबाबतही असंच झालं होतं. परंतु या सर्व घटनांमध्ये निवडणूक आयोगाने दुसऱ्या गटाला चिन्ह दिलेलं नव्हतं. परंतु पंतप्रधानांच्या गुलाम निवडणुक आयोगाने आता केलं आहे. परंतु आता आपली लढाई सुरू झाली आहे. असं म्हणत तुम्ही घाबरलात का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी कारच्या बोनेटवर करत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना केलं.
हेही वाचा…“शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,” उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी कलानगरच्या परिसरात गाडीच्या टपावर भाषण केलं आहे. यावेळी 30 ऑक्टोंबर 1968 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील असं भाषण केलं होतं. त्याची आठवण आज शिवसैनिकांनी आली. यावेळी असंख्य शिवसैनिक मुंबईत दाखल होऊन उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणा देतांना दिसत आहे.
हेही वाचा..““विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठाम”, रविंद्र चव्हाण यांनी घेतली मनसेच्या नेत्यांची भेट
उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असतांना उपस्थित असलेले शिवसैनिक देखील आक्रमक झालेले बघायला मिळाले. यावेळी हात पाय तोडायचे काय ?असं देखील गर्दीतून ऐकायला येत होतं. यातच आता पुन्हा एकदा या बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी पुन्हा राजकारणात तुमच्या खांद्याला खांदा लावून मैदानात येणार आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”
- हेही वाचा..“‘भगवा जाणीव’ आंदोलनाद्वारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची नवी ‘स्टंटबाजी’?
- हेही वाचा..“लहानपणी आणीबाणीबद्दल ऐकलं होतं, पण..;” निवडणुक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“धनुष्यबाण गेल्यानंतर आता ‘मशाल’ही ठाकरेंकडून जाणार” निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्का
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंनंतर आता अजित पवारांचा नंबर”, भाजप नेत्यांचं सुचक विधान