मुंबई : निवडणुक आयोगाने काल शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता ठाकरे गटाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावरून निवडणुक आयोगाने तात्पुरता दिलेलं मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त पुण्यातील पोटनिवडणुकांपुरतंच वापरता येणार असल्याचं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे याविरोधात पुन्हा एकदा ठाकरे गट निवडणुक आयोगाकडे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा..‘“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
सध्याची घटना लोकशाही विरोधी असल्याचं निरीक्षण नोंदवत धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आहे. याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसला आहे. तसेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर निवडणुक आयोगाने ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं होतं. त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना हे शिंदे गटाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला देण्यात आलं होतं.
हेही वाचा…“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
काल निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण यावर निर्णय दिल्यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. यातच ठाकरे गटाला देण्यात आलेलं चिन्ह आणि नाव फक्त पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत वापरण्यात येणार असल्याचं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे याविरोधात केंद्रीय निवडणुक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंनंतर आता अजित पवारांचा नंबर”, भाजप नेत्यांचं सुचक विधान
- हेही वाचा…“शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,” उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
- हेही वाचा..““विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठाम”, रविंद्र चव्हाण यांनी घेतली मनसेच्या नेत्यांची भेट
- हेही वाचा..‘शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच, राजकीय गणितं बदलली, 2024 ला शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी?
- हेही वाचा..“शिवसेना अन् धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय