मुंबई : महावितरणाचे खासगीकरण थांबवण्यात यावे, या मागणीसाठी आजपासून महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे काल रात्रीपासून राज्यातील अनेक भागात वीज गायब झाली. त्यानंतर राज्य सरकारने यावर सावध भूमिका घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून महावितराण्याचे कर्माचाऱ्याशी बैठक घेऊन यावर तोडगा काढला.
मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन
महावितरणाचे खासगीकरण थांबवण्यात यावे, यासाठी राज्यातील एकूण 32 कर्मचारी संघटनांनी संप पुकारला होता. या सर्वच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी आपला संप मागे घेतला आहे. असंही त्यांनी सांगितले..
“माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
काल रात्रीपासून आपल्या विजेच्या तिन्ही कंपन्यांच्या कर्माचाऱ्यांनी काही मागण्यासंदर्भात संप सुरू केला होता. यात कंत्राटी कर्मचारी संघटनेचाही समावेश होता. यावेळी तीन-चार मुद्यांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. या उलट पुढील तीन वर्षात या तीन कंपन्यांमध्ये 50 हजार कोटींची गुंतवणुक राज्य सरकार स्वत:करणार आहे. यामुळे आपले अॅसेट्स कुणाला देण्याचा अथवा अशा प्रकारे त्याचे खासगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
दरम्यान, यावरून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. महावितरणाच्या खाजगीकरणाला विरोध करत कर्मचारी, व अभियंते यांनी तीन दिवसांचा पुकारलेला संप सरकारला टाळता आला असता. दोन महिन्यांपासून कर्मचारी संघटना मागणी करत होत्या. पण सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
Read also
- “मी कुठं म्हणालो की, शरद पवारांना जाणता राजा म्हणा म्हणून..”, अजित पवार
- बावनकुळेंकडून ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख, टिलल्या आमदार पुतळा जाळणार का ?
- मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
- “आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…
- “गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”