मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील मैदानावरील दसरा मेळाव्याची पंरपंरा सुरू ठेवली आहे. राज्यातील कोनाकोपऱ्यातून दसरा मेळाव्यासाठी लोक येणार असून ते आतापासूनच गाडी कुठं पार्क करायची, कुठून प्रवेश करायचा यासाठी लोक मुंबईत मध्ये येत आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा न भुतो न भविष्यम् अशा पद्धतीचा होणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांनी दिली आहे.
सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार
आपल्या वाडवडिलांना म्हटलं आहे की, दसरा आणि हात पाय पसरा. शिवसेनेचा खरा दसरा मेळावा याच शिवतीर्थावर होणार आहे. परंतु कुणी जर हातपाय पसरायचा प्रयत्न करत असेल तर याद राखा. तसेच दुसऱ्या दसऱ्या मेळाव्याला 1800 एसटी बस बुक केल्या आहेत. आठराशे गुणाले 50 म्हणजे 90 हजार लोकांना आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना पुर्ण जाणीव करून दिली आहे की, तुमच्या दसऱ्या मेळाव्याला कुणीही येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागातून माणसं आणण्याची व्यवस्था करावी. अशी बहुतेक त्यांना कल्पना दिली असेल. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“दसरा मेळाव्यात अन् अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिंदेंची लोकप्रियता दिसणार”
तसेच उद्धव ठाकरे यांच्या ठाकरी शैलीने विरोधकांना दणका बसला आहे. त्यामुळे काही जणांना बाम देऊन बाम लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. उद्धव ठाकरे यांचा एक एक शाब्दिक आघात त्यांच्यावर बसत आहेत त्यामुळेच ते टोमणे सभा म्हणून उल्लेख करताहेत. त्यांनी कितीही गाड्या करू द्या. कितीही घोषणा करू द्या.
सुप्रिया सुळेंकडून RSS चं मनभरून कौतुक…! म्हणाल्या,”राजकारण बाजूला ठेऊन..;”
महाराष्ट्रातील जनतेने हे ठरवलेलं आहे की, ज्यांनी 50 खोके घेतले आहेत. त्यातले काही खोके विश्वासघाताने घेतले आहेत. त्यांच्या गाडीतून यायचं अन् शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायचं. तसेच ज्यांना सुरत गुवाहाटीला जाण्यासाठी पैसाची कमतरता भासली नाही त्यांना मुंबईत येण्यासाठी पैसाची कमतरता भासणार नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Read also
- संत गाडगेबाबांची दशसुत्री नव्याने लावली पण ठाकरेंची सही गायब…! नव्या सरकारचं चाललंय काय..?
- गोव्यातून बाटली घेऊन येणाऱ्याला मोक्का, अन् आमदार घेऊन येणाऱ्याला खोक्का; ऱाष्ट्रवादीने डिवचलं
- आई भवानी…! आपला महाराष्ट्र चिंतामुक्त कर..; देवेंद्र फडणवीस
- “आमचच नाणं खणखणीत, म्हणून जो उठतोय तो आमच्याच विरोधात बोलतोय”; सुप्रिया सुळे
- “पवार साहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला निघालोय”; शहाजी बापू पाटील