मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांची दशसुत्री काढल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रखरपणे टिका केली होती. यानंतर दशसुत्री परत लावणार असल्याचं सरकारने त्यानंतर स्पष्ट केलं होतं.
“दसरा मेळाव्यात अन् अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिंदेंची लोकप्रियता दिसणार”
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसुत्रीवर अक्षर अस्पष्ट असल्याचं कारण सांगत ती काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर परत आता त्याठिकाणी नवीन लावण्यात आली आहे. यासाठी राज्यातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संत गाडगेबाबा यांनी लोकांना उद्देशून जीवनाचं दहा सुत्र सांगितलं होतं. त्यामध्ये भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानाड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शित्रणासाठी मदत, बेघरांना आश्रय, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय़, गरीब तरूणतरूणींचे लग्न, दु: खी व निराशांना हिंमत अशी दशसुत्री सांगितली होती.
सुप्रिया सुळेंकडून RSS चं मनभरून कौतुक…! म्हणाल्या,”राजकारण बाजूला ठेऊन..;”
महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्त्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांची दशसुत्री लावण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची सही देखील होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ती परत लावली असून त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही गायब आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ओळख पुसरण्यासाठीच की काय दशसुत्री ही नवीन लावली असल्याची आता चर्चा रंगली आहे.
Read also
- गोव्यातून बाटली घेऊन येणाऱ्याला मोक्का, अन् आमदार घेऊन येणाऱ्याला खोक्का; ऱाष्ट्रवादीने डिवचलं
- आई भवानी…! आपला महाराष्ट्र चिंतामुक्त कर..; देवेंद्र फडणवीस
- “आमचच नाणं खणखणीत, म्हणून जो उठतोय तो आमच्याच विरोधात बोलतोय”; सुप्रिया सुळे
- “पवार साहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला निघालोय”; शहाजी बापू पाटील
- सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार