मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उद्या दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणुक आयोग करणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीबाबत आचार सहिंता तसेच निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा होणार ? याबाबत निवडणुक आयोग उद्या पत्रकार परिषदेत घेऊन याबाबत माहिती देणार आहे.
हेही वाचा..बारामतीप्रमाणेच ‘या’ ठिकाणीही होणार भावजय-विरूद्ध नणंद सामना, शरद पवारांनी घोषीत केला उमेदवार
मागच्या लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदान झालं होतं. त्यानंतर एकाच दिवशी लोकसभा मतदानाची मोजणी करण्यात आली होती आणि निकाल घोषीत करण्यात आला होता. यातच आता २०२४ ची लोकसभा निवडणुक किती टप्प्यात होणार ? मतदान केव्हा होणार ? अर्ज मागे घेण्याची तारिख, तसेच संपुर्ण मतदान प्रक्रिया याबाबत उद्या निवडणुक आयोग माहिती देणार आहे.
एव्हीएम मशीन त्याचा विचार करून महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान होणार निवडणुक आयोग त्याचा विचार करणार आहे. यातच महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या राज्यांचा विचार तसेच जिल्ह्यांचा विचार करून निर्णय घेणार आहे. यातच उत्तर भारत, दक्षिण भारत, तसेच इशान्य भारतात असे विचार करून मतदानाचा आराखडा मांडला जाणार आहे.
हेही वाचा..वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा ?
दरम्यान, देशात एकूण ५४३ जागांसाठी देशपातळीवर अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजप आणि कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली आहे. यातच उद्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजपसह इतर पक्षातील उमेदवारांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा.ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच महायुतीत खळबळ, उमेदवारीसाठी महायुतीत ‘हा’ खासदार बंडाच्या तयारीत
हेही वाचा…कॉंग्रेसकडून भाजपचा भांडाफोड, राहुल गांधींचा ‘तो’ व्हिडीओ भाजपच्या अंगलट, चांगलचं सुनावलं