मुंबई : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅगने जलयुक्त शिवार योजनेवर काही आक्षेप घेतले होते. कॅगच्या अहवालात ४ जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याची सांगितले होतं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाकरे सरकारे SIT ची समिती स्थापन केली होती. मात्र, आता यासंदर्भात अभियानाच्या बाजूने अर्थात देवेंद्र फडणवीसंना क्लिन चीट देणारा अहवाल ठाकरे सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे.
अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली असून उपसा वाढला तरी अनेक गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. तसेच जलयुक्तमुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमान दर्जातही वाढ झाली आहे, असा सविस्तर अहवाल सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे. हा अहवाल म्हणजे एक प्रकारे जलयुक्त शिवार अभियान आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही क्लीनच असल्याची कबुली ठाकरे सरकारने दिली असल्याचे म्हंटलं जातं आहे.
समीर वानखेडे यांच्या कुटूंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या; जीवाला धोका असल्याचा पत्नीचा दावा
यासाठी नागपूर, अहमदनगर, बुलडाणा, पालघर, सोलापूर, बीड अशा ६ जिल्ह्यांमधील अभियानाच्या १ लाख ७६ हजार २८४ कामांपैकी ५८ हजार ७३८ कामांचे मूल्यमापन करण्यात आलं. या मूल्यमापनानंतर हा अहवाल देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी दिलेल्या अहवालाचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.
देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला, असंही उदयनराजे म्हणतील – शिवेंद्रराजेंचा घणाघात
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जानेवारी २०१५ ला जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली होती. तेव्हापासून या त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या अभियानाकडे पाहिले गेले. मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅगने या योजनेवर काही आक्षेप घेतले होते. कॅगच्या अहवालात ४ जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याची सांगितले होतं. जलयुक्त शिवार योजनेत ९ हजार ६३३.७५ कोटी रूपये खर्च करण्यात आले. मात्र पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात सरकारला अगदी थोडेच यश मिळालं असल्याचं कॅगच्या अहवालामध्ये म्हटलं होतं.
Read Also :
- समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत नवाब मलिकांचा अजून एक गौप्यस्फोट; म्हणाले…
- विधानसभा अध्यक्षांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू; महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती!
- तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं योग्य नाही; आरोप लागले आहेत तर चौकशी करा – देवेंद्र फडणवीस
- महाविकास आघाडी सरकारने औकातीत राहावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; भाजप आमदाराने भरला दम
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार