पुणे : महायुतीचं सरकार स्थापन होऊन वर्ष उलटत नाहीत, त्याआधीच महायुतीच वादाचे फटाके फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित सत्तेत आहे. मात्र नियोजन समितीत नव्या वादाला सुरूवात झालीय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असून अजित पवारांच्याच कामावर शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा…“वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होतेय”, जलीलच्या लोकसभा युतीच्या प्रस्तावावर ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया
अलिकडेच पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीचे इतिवृत्त नसतानाही ८०० कोटींची कामे मंजूर झालीच कशी ? असा सवाल शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना केला आहे. तसेच ही ८०० कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यामुळे पालकमंत्री म्हणून अजित पवार असतांनाही शिंदे गटाने अशी भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी ; मोदींसह भाजपच्या नेत्यांचे संपुर्ण देशात होणार दौरे
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीत शिंदे गटाने आडकाठी भूमिका घेतल्याने अजित पवारांची मोठी गोची झाली आहे. यासंदर्भात शिंदे गटातील नेत्यांनी एक निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले असून यामुळे सत्तेतल्या तिन्ही पक्षातील धुसफूस आता समोर आलीय. त्यामुळे याची चर्चा सध्या जोरदार सुरूय.
READ ALSO :
हेही वाचा…“काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा”, 6200 किलोमीटर, १४ राज्य अन् २० मार्चला मुंबईत होणार समारोप
हेही वाचा“तुम्ही प्रसाद दिला तर आमचे कार्यकर्ते महाप्रसाद देतील,” ठाकरे गटाच्या महिला नेत्याने शिंदे गटाच्या नेत्याला दिला इशारा
हेही वाचा…“भाजप हे पळपुटे, रणछोडदास..! भाजपचं काम फक्त पापड-लोणचं बनवण्याचं”, कुणी केली टिका ?
हेही वाचा..चंद्रकांत खैरेंचा पत्ता कट होणार ? अंबादास दानवे बाजी मारणार? मातोश्रीवर राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा..लोकसभेसाठी वंचितने महाविकास आघाडीकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा ; दोन आठवड्याची दिली मुदत, नाहीतर..