चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेत सतत आर्थिक गैरव्यवार झाल्याचे निर्दशनास आले आहे. या प्रकणाची खसखोल चौकशी राज्यशासनाकडून करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले यांच्याकडे भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकाकडून (दि.८) मंगळवार रोजी पटोले याच्याकडे करण्यात आली आहे. मनपातील गैरव्यवहाचे ठोस पुरावे सत्ताधारी पक्षातील भाजपा नगरसेवकांनी दिले आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. याप्रकरणा संबंधीत लवकरच आपण मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. तसेच या गैरव्यवहाराची एखाद्या समिती मार्फत चौकशी केली जाईल, विधानसभेत सुद्धा मनपातील गैरव्यवहाराची प्रकरण लावून धरु असे पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, जनतेच्या पैशाची या पध्दतीने आर्थिक लुट योग्य नाही. मनपातील अनियमिततेची एका समितीमार्फत चौकशी केली जाईल. विशेष म्हणजे येत्या आठ दिवसात याप्रकरणी समितीचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. तसेच वेळप्रसंगी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली तर तिथे सुध्दा आम्ही भांडू असेही ते म्हणाले. भाजपाचे काही लोकप्रतिनिधी विधानसभेत केवळ स्वच्छतेचा आव आणतात, मात्र चंद्रपुर महानगरपालिकेतील कारभार बघितला तर किती गैरव्यवहार सुरू आहे, हे लेखापरिक्षण अहवालून समाेर आले असा टाेलाही यांनी हाणला. यावेळी खासदार बाळू धानाेरकर, आमदार सुभाष धाेटे, आमदार प्रतिभा धानाेरकर. आमदार अभिजित वंजारी, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संताेष रावत ,जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते.
भाजपा नगरसेकाचा महापौरांविरोधात असंतोष
भाजपच्या नगरसेवकांच्या असंतोषाचे कारण मनपातील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत दडले आहे. राखी कंचर्लावार यांना महापौरपदी पक्षाने संधी दिल्यापासून भाजपच्या नगरसेवकांच्या एका गटात नाराजी पसरली होती. कंचर्लावार आणि त्यांचे नगरसेवक पती संजय कंचर्लावार आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. दोघेही पक्षात नवखे असताना मनपाची सुत्र निष्ठावंताना डावलून कंचर्लावार यांच्या हाती दिले. त्यातच स्थायी समितीच्या सभापतीपदी रवि आसवानी यांना संधी दिली. सलग चार वेळा निवडून येणारे वसंता देशमुख यांना डावलले. त्यामुळे असंतोष आणखी वाढला. याच असंतोषातून भाजपचे काही नगरसेवकांनी चक्क काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे मनपातील गैरकारभाराची तक्रार केली.
Read Also :