मुंबई : ‘आरे’ हा मुंबईकरांसाठी संवेदनशील विषय असला, तरी राज्याचे सत्ता केंद्र असलेल्या मुंबईसाठी आणि मुंबईच्या राजकारणासाठी तो दुधारी तलवारीसारखा विषय आहे. युती सरकारच्या काळात आरे मेट्रो कारशेड वरून प्रचंड रान माजले होते.
हे पण वाचा, …येत्या तीन वर्षातच नाना पटोले, अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी
दरम्यान, ही पार्श्वभूमी पाहता आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा प्रस्ताव, नव्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने बदलला आणि कारशेड आरेतून कांजूरमार्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता यावरून देखील बरंच राजकारणं आणि वाद होताना दिसत आहेत.
हे पण वाचा, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत; आपण त्यांना पाहिलतं का?
आरे मधील या कारशेडसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. दरम्यान, या याचिकेवर झालेल्या सुनावणीत एमएमआरडीएने दिलेल्या माहितीवरून आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी, ट्विट करत ठाकरे सरकरसमोर काही महत्वाचे सवाल उपस्थित केले असून, त्यांनी याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
हे पण वाचा, भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याच्या आरोपावरुन आमदारांमध्ये वादावादी
“मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने ३ हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?,” असे सवाल आशिष शेलार यांनी केले आहेत.
मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले.
सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही?
मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव?
कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले?
अशी बेमालूमपणे बनवाबनवी? 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
तसेच, “कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी”… खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!,” अशी खोचक टीकाही त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे केली आहे.
"कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी"…खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो.
हळूहळू सत्य समोर येतेय!जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे?
चेहरा भोळा अन् भानगडी सोळा! 2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2021
Read Also :
- मराठा आरक्षण मूक आंदोलन : “सर्वांचा पाठिंबा आणि कुणाचाही विरोध नाही, तर हा पेच सुटत का नाही?”
- आमदार संजय शिंदेंच्या विरोधात अतुल खुपसेंचे बेकायदेशीर कर्जप्रकरणी पुण्यात अर्धनग्न आंदोलन
- दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभेचे उद्या १७ जून रोजी राज्यभर होणार आंदोलन
- भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू – निलेश राणे
- शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा