मुंबई : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची शिवसेना भवनासमोर जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. त्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला सज्जड इशारा दिला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
हे पण वाचा : ‘मी सुपारीचोर असेल तर निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती’
शिवसेना भवनासमोर सेना-भाजपमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर जशास तसे उत्तर दिलं जाईल. झालेल्या हल्याची माहिती नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.
हे पण वाचा : देवेद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात राजकीय गुफ्तगू; निलेश राणेंचा गौप्यस्फोट
खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कवच घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमच्या आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
हे पण वाचा : शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा
मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी. इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखं काय होतं? प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचं कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली?, असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.
Read Also :
- ‘आता वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही’
- शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा
- …येत्या तीन वर्षातच नाना पटोले, अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी
- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत; आपण त्यांना पाहिलतं का?
- ‘मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी ‘अधिवेशनाच्या’ पहिल्याच दिवशी करणार’