मुंबई : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादात मुख्यमंत्र्यांनी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यासोबतच विविध मुद्यांवर भाष्य केले. लसीसाठी एकरक्कमी पैसे देण्यास तयार असल्याचे देखील ते म्हणाले. यावरून आता भाजपकडून जोरदार टीका करत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे.
नेहमी प्रमाणे फेसबुक लाइव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा ना विचार. किमान उत्तर हवी होती, अशी टीका करत भाजप नेते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना सहा प्रश्न विचारले आहेत.
नेहमी प्रमाणे #फेसबुक_लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा ना विचार
किमान उत्तर हवी होती
◾️गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार?
◾️महिन्या भरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार? …2— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 30, 2021
गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार? महिन्या भरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार? राज्यांने महीना भरात लस विकत का घेतली नाही? शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परिक्षा न घेणे का? अर्थचक्र कधी फिरणार? माझ गाव करोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?, असे सहा प्रश्न केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’, असा सवाल त्यांनी केला आहे.
Read Also :