मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे एका इमारतीचा भाग कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11जणांचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य या ठिकाणी सुरू आहे. आता या दुर्घटनेवरून भाजप नेते राम कदम यांनी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित BMC कडून योजनाबद्ध हत्या असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.
मालाड मालवणी मधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित @mybmc कडून योजनाबद्ध हत्या आहे. जर वेळेत अनधिकृत उंची रोखली असती. वसूलीचे धंदे थांबवलेले असते तर हे दुर्दैवी मृत्यू रोखता आले असते. सवाल आहे #Shivsena आणी मुंबई महापालिका या हत्येची जबाबदारी घेणार का?
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) June 10, 2021
राम कदम म्हणाले की, मालाड मालवणी मधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित बीएमसी कडून योजनाबद्ध हत्या आहे. जर वेळेत अनधिकृत उंची रोखली असती. वसूलीचे धंदे थांबवलेले असते तर हे दुर्दैवी मृत्यू रोखता आले असते. सवाल आहे शिवसेना आणि मुंबई महापालिका या हत्येची जबाबदारी घेणार का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. काल रात्री जवळपास 11 च्या सुमारास ही घटना घडली.
Read Also :
- आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला सरकार देणार 600 कोटी
- ‘मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी’
- 2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला हवा का? जयंत पाटील म्हणाले…
- ‘शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार’
- फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली होती लस, RTI मधून स्पष्ट