मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कालावधीत आतापर्यंत राष्ट्रवादीला एकदा स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. मात्र, असे असले तरीही कोणत्याना कोणत्या प्रकारे राष्ट्रवादी सातत्याने सत्तेत आहे. 22 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.
2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का?, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही, जे पक्ष अधिक चांगला झाला, जनतेने साथ दिली तर त्या त्या वेळी योग्य निर्णय शरद पवार घेतील, असे त्यांनी स्पष्ट केलं. टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
पहिलं काम आहे पक्ष बलवान करणे. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचं जीवनमान सुधारणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकाबाबत बोलताना ते म्हणाले की, आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल, मात्र आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे.
Read Also :