अहमदनगर –अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात अकोले नगरपंचायतीचीही निवडणूक होणार आहे. भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सोमवारी रोजी भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे महाविकास आघाडी होणार की नाही या बाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
सोमवारी सकाळी अकोलेतील भाजप पक्ष कार्यालय पासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घोषणा देत तहसील कार्यालयात पोहचले. यावेळी माजी आमदार पिचड यांच्या उपस्थितीत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.
शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात
वैभव पिचड म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यासह शहरातील जनतेला आमच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र दोन वर्षांत महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. दोन वर्षात त्रस्त झालेली जनता पुन्हा आपल्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा पिचड यांनी करत अकोले तालुक्यातील महाविकास आघाडी ही तीन तिघाडा काम बिघाडा आहे. तालुक्यातील गोरगरिबांचे धान्य चोर कोण आहे. हे जनतेने पाहिले असल्याचा टोमणा ही त्यांनी मारला.
भाजप-मनसेचे मिशन पुणे; फडणवीस-ठाकरे हे दिग्गज नेते आज पुण्यात
दरम्यान, अकोले नगरपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) भाजपसोबत आहे. नगरपंचायतच्या सर्वच्या सर्व १७ प्रभागात भाजपच्या चिन्हावर सर्व उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एक जागा आम्हाला मिळेल असा विश्वास आर.पी.आय चे नेते विजय वाकचौरे यांनी व्यक्त केला.
Read Also :
- अध्यक्षपद हुकल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
- शिवसेना गोव्यात स्वबळावर तर उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?, संजय राऊतांनी केले स्पष्ट..
- श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर
- कोरोनाच्या नावाखाली बिळात बसलेल्या वाघानं आता तरी बाहेर यावं – सदाभाऊ खोत