नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे अजित पवार गटाचा उत्साह वाढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यातच पवार आमच्यासोबत येतील असा विश्वास देखील अजितदादा गटाच्या आमदारांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणी कारवाईंच्या हालचाली वाढल्या, बड्या अधिकाऱ्याला अटक
राजस्थान, मध्यप्रदेश, आणि छत्तीसगड राज्यात भाजपने एकहाती सत्ता आणली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीएसोबत आता शरद पवार येतील असा विश्वास अजित पवार गटातील आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एनडीएसोबत येण्यासाठी शरद पवारांना अनेकदा विनंती करण्यात आली. परंतु आता विधानसभांच्या निकालानंतर शरद पवारांचा विचार बदलेल असंही अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…फक्त १२ वी पास, अंगावर ११ गुन्हे, तरीही ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला पाणी पाजलं, निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्या इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत होत आहे. परंतु काॅंग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी होत असलेल्या इंडियाच्या बैठकीसाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यातच ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे जाणार असून शरद पवार बैठकीसाठी जाणार का नाही ? यबाबात अजूनही शंका व्यक्त करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला, कार्यकर्त्यांनी दिला बेदम मार
हेही वाचा…अधिवेशनासाठी अजित पवारांचा ‘विजयगड’ बंगला सजला, दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटीचा केला खर्च
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी जोशींचं नाव चर्चेत, परंतु पक्षाने उमेदवारी दिली तर मीच लढवणार”, धंगेकरांचं मोठं विधान
हेही वाचा…अमरावतीत शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, जयंत पाटील, अनिल देशमुख, पवार मोर्चात हजर राहणार
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, दापोलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का