मुंबई : राज्यात कोळसाचा तुटवठा असल्याने अनेक ठिकाणी बत्ती गुल होत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. मात्र याचा फटका मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील बसला. त्यामुळे ऑनलाईन उपस्थित असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मध्येच संपर्क तुटला. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज्य सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बत्ती गुल झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या ज्ञानाचा प्रकाश पाडू शकले नाहीत. समस्त मंत्रिमंडळ या अदभुत बौद्धिकाला हुकले याचा सर्वस्वी दोष नितीन राऊत यांना जातो. असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावर महाविकास आघाडीतील नेते काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, नितीन राऊत, तसेच अनेक महत्वाचे मंत्री उपस्थित होते. त्यांची ही बैठक मंत्रालयात दुपारी ४ वाजता सुरू झाली. मंत्रालयातील सातव्या मजल्यावर अजित पवार यांच्यासह काही मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. मात्र सांयकाळी ५. ३० च्या दरम्यान ओबीसी आरतक्षणाबाबत मंत्र्यांमध्ये चर्चेा करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले.
दरम्यान, त्याच वेळी ओबीसी आरक्षणावर चर्चा सुरू असतानाच पंधरा- वीस मिनिटे शिल्लक असताना अचानक वीज गेली. त्यानंतर इन्व्हर्टवर माईक आणि यंत्रणा सुरू झाली, पंरतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क तुटला. जवळपास दहा मिनिटे प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्याशी संपर्क झाला नाही. यावरून भाजपने त्यांच्यावर टिका केली आहे.
Read also:
- “खासगी नाही तर सरकारी रुग्णालयातच उपचार घ्या”; कोर्टाचा अनिल देशमुखांना धक्का
- “औरंगजेबाच्या कबरावर फुलं वाहिली हे मी फक्त ठाकरे सरकारच्या काळात पाहिले”
- हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या