मुंबई : केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत आहे. महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव असल्याची टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
“कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आले असून ते महाराष्ट्रातील उद्योगपतींशी चर्चा करणार आहे. त्यावरून नाना पटोले यांनी टिका केली आहे. महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या मदतीने उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजपाशासित राज्यातील गुंतवणूक वाढावी व महाराष्ट्राचे महत्व कमी व्हावे यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार पाडून ईडीचे सरकार आणले आहे असंही त्यांनी म्हटले.
मुंबई फिल्मसिटी युपीला जाणार असल्याच्या आरोपावर योगीचं उत्तर, म्हणाले, मुंबई ही..
महिला, अल्पसंख्याक, दलित समाज योगींच्या राज्यात सुरक्षित नाही, ते भयभित होऊन जीवन जगत आहेत. योगी आदित्यनाथ हे धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करतात आणि ज्या राज्यात धर्माच्या नावावर राजकारण केले जाते व सरकार चालवले जाते त्या राज्यात कोणता उद्योगपती गुंतवणूक करण्यास धजावेल? उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खराब आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्वतःच न्यायालय व न्यायाधीश असल्याच्या अविर्भावात बुलडोझर चालवून गोर गरिब व सामान्य माणसांची घरे जमीनदोस्त करते. असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“‘टिल्लू’ च्या वर्मावर घाव बसलाय”; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला
दरम्यान, बुलडोझर बाबा तुमच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अगोदर सुधारावा, अन् मग महाराष्ट्रात येऊन गुंतवणुक करा. नाहीतर ज्या राज्यात कायदा व सुव्यवस्था अत्यंत खराब आहे. त्या राज्यात कोणता उद्योगपती गुंतवणुक करणार ? असा खोचक सवाल देखील नाना पटोले यांनी केला आहे.
Read also
- “40 गद्दार आमदार, अन् 13 खासदार गद्दारांनी या वर्षात तरी निवडणुक घेऊन दाखवावी”; आदित्य ठाकरेंचा इशारा
- नितेश राणेंवर रूपाली पाटील भडकल्या, म्हणाल्या, “टिल्या बेडकांनी धरणात..”
- योगींच्या जाहिराती महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना देण्यामागचा भाजपचा छुपा अजेंडा काय?
- “राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च”, प्रियंका गांधी
- जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग