मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सीबीआयच्या अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं. त्यानंतरही मग सीबीआयने कुणाच्या इशाऱ्यावर कारवाई केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे सर्व अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीला बदनाम करण्याचं मोदी सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप करत याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी सचिन सावंत यांनी केलीय.
नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
सचिन सावंत म्हणाले, “अनिल देशमुख आणि मविआला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित 100 कोटी रुपये वसुली आरोपात अनिल देशमुख यांची कोणतीही भूमिका नाही आणि चौकशी बंद केली होती.”
मोठी बातमी : मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातल्या अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?
“तपास अधिकाऱ्याच्या अहवालाला बाजूला सारून सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली हे शोधण्यासाठी या षडयंत्राची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशी करा असे सांगितले असताना न्यायालयाची दिशाभूल करून FIR नोंदवणे हा CBI चा मोठा गुन्हा आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
.@AnilDeshmukhNCP आणि मविआ ला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित ₹१०० कोटी वसूली आरोपात अनिल देशमुख जी यांची कोणतीही भूमिका नाही आणि चौकशी बंद केली होती pic.twitter.com/QZk6Vrw0ZW
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 29, 2021
“गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असंही सचिन सावंत यांनी सांगितलं. यावेळी सचिन सावंत यांनी या सर्व प्रकाराचा जाहीर निषेधही केलाय.
Read Also :
- संजय राऊतांनी शिवसेना पुर्णपणे खड्यात घातली; नारायण राणेंचा प्रहार
- राज्यात कायद्याचं राज्य आहे, मग अनिल परब यांना स्वत:हून अटक करा – चंद्रकांत पाटील
- महामारी नियमांचं पालन करुन राष्टवादी अध्यक्ष शरद पवार करणार राज्याचा दौरा
- मी न घाबरणारा मराठा! छोटेखानी भाषणात ऍड. उज्ज्वल निकम यांचे उद्गार
- राजनाथ सिंग यांचे महाराजांवरचे ‘ते’ वक्तव्य वादात, कोल्हेंकडून निषेध तर संभाजी ब्रिगेडची माफीची मागणी