पुणे : राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी केला होता. त्यावरून आता वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेत, या वक्तव्याचा निषेध केला आहे.
“राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले
केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. आपला जाज्वल्य इतिहास हा साहित्य, कलाकृती या माध्यमातून निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात पोहोचवला पाहीजे, असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
“महाराज राष्ट्रनायक ठरले, ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला, तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीला दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यामागे होती. तसेच, महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट १६७१ च्या आसपास झाल्याची नोंद कागदोपत्री आढळते,” असे त्यांनी सांगितले.
आपला जाज्वल्य इतिहास हा साहित्य, कलाकृती या माध्यमातून निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात पोहोचवला पाहीजे, असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. @kolhe_amol
— NCP (@NCPspeaks) August 28, 2021
दुसरीकडे, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रामदास स्वामींची कधीही भेट झालेली नाही. तसा कुठलाही पुरावा नाही. हे हायकोर्टानेही मान्य केले आहे. मात्र मुद्दामून महाराजांचे कर्तृत्व नाकारण्यासाठी गुरु म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव यांचा आधार घेतला जातो. आरएसएसच्या तथाकथित इतिहासकारांनी आजवर खोट्या आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन केले आणि महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही फार मोठी टोळी आहे,” असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
“…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
तसेच, “राजनाथ सिंग यांनी खोटा आणि चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमांत सांगून आपल्या अज्ञानाचे दर्शन दिले आहे. महाराजांना रामदास आणि कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले असे कोणीही लिहिले-सांगितले नाही. राजनाथ सिंग यांनी खोटा इतिहास सांगुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. असा इतिहास आम्हाला कधीही मान्य नाही. त्यामुळे, त्यांनी तमाम शिवप्रेमींची माफी मागावी,” अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
Read Also :
- नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांची सणसणीत चपराक
- उन्होंने हवा कर दी सर! नारायण राणेंना केंद्रातील बड्या नेत्याचा फोन, संवाद झाला व्हायरल
- “अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा
- तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
- मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा