नाशिक : सध्या राज्यात भाजपच्या ‘जन आशीवार्द’ यात्रेवरून गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत असून, नारायण राणेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटकेवरून छेडले आहे.
मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा
नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी, “फार बोलणार नाही, पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. पण अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामांची चर्चा आणि पर्वा करत कधीही करत नाही,” असं म्हणत, “मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्यात काल बंद दरवाजा आड चर्चा झाली. ती काय झाली हे सगळ्यांना माहिती आहे,” असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
“राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले
यावेळी, “आम्ही नारायण राणेंना भाजपचा मानत नाही. भाजप त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवणार असेल, तर आमच्याकडेही अनेक खांदे आहेत. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा द्यायला तयार आहोत. राणेंचा आम्ही दोनवेळा पराभव केला आहे,” असं म्हणत, “राज्यावर यापुढेही शिवसेनेची सत्ता असेल. आज सरकार तीन पक्षांचं आहे, उद्या काय माहिती एका पक्षाचं येऊ शकेल,” असा दावा त्यांनी केला आहे.
मोठी बातमी : मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातल्या अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?
तसेच, “सेनेसमोर उभं राहण्याची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. खुर्ची, पद म्हणजे सत्ता नाही. सत्ता मनगटात असते. सत्ता सदैव बाळासाहेबांची होती आणि चंदनाच्या चितेवर जाईपर्यंत त्यांचीच राहिली,” असं सांगत त्यांनी, “तुमच्या कुंडल्या काढू? तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आम्ही संदुक उघडलं तर काय-काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा,” असा इशारा त्यांनी भापप आणि नारायण राणेंना दिला आहे.
Read Also :
- तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
- एकनाथ खडसे यांच्यावरील होणारी ED ची कार्यवाही राष्ट्रवादीच्या फायद्याची; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
- नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
- वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही; नारायण राणेंनी पुन्हा ललकारले
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे