सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी केंद्रीय मंत्री म्हणून निवड केली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. सरकारने केलेल्या कामाची माहिती या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. जनआशीर्वाद यात्रेला दहा दिवस झालेत. लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. लोकांनी खूप गर्दी केली, रिकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. पत्रकारांनी मला खूप प्रसिद्धी दिली. पैसे देऊनही इतकी प्रसिद्धी मिळत नाही. यासाठी पत्रकारांचे मी आभार मानतो, अशी उपहासात्मक टिप्पणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे
यात्रेत मध्ये अपशकुन झाला. मांजर आडवी गेली, मी त्याची दखल घेत नाही. अग्रलेख येतायत, माझ्या मुलांबद्दल बोललं जातं आहे. पण, आधी आपली मुलं बघा. संजय राऊतांना म्हणा तुझ्या मालकांची मुलं काय करताहेत ते बघा. संजय राऊतांमुळे सेना लयाला गेली. माझ्या मुलांबाबत बोलू नका, माझी मुलं चांगली आहेत. कोणतीही वाईट गोष्ट त्यांच्याकडून घडणार नाही. दोन्ही मुलांचे माझ्यावर प्रेम आहे. माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे. माझ्या मुलांवरील टीका थांबली पाहिजे. हे थांबल नाही, तर माझ्या प्रहार मधून सुरू करेन. कोणाचं उठण बसणं, काय करता, कोणत्या केस मध्ये काय आहे याची सर्व मला माहिती आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.
नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
नारायण राणे म्हणाले की, ‘जन आशीर्वाद यात्रेचा आज दहावा दिवस आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग अशी ही यात्रा सुरू आहे. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय, उशिरा मी जाऊनही लोक थांबत होते. मला मोठी प्रसिद्धी पत्रकार मित्रांनी दिली. पैसे देऊनही एवढी प्रसिद्धी मिळत नाही. रोजगार निर्माण करणारा हा विभाग आहे. देशाच्या विकासाला साथ देणारा हा विभाग आहे. मी सिंधुदुर्गवासीयांना सांगतो, तुम्हाला मला साथ द्यायची असेल, तर उद्योजक व्हा.’
मोठी बातमी : मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातल्या अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?
नारायण राणे यांनी मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. अनिल परब स्वत:ला राष्ट्रपती, पंतप्रधान समजत होते. दम देत होते. अटक करा म्हणतो, रथ यात्रा जाऊ देणार नाही म्हणतो. पण, कुठेतरी दिसले का माणसं? फूशारकी मारत होते, पद मिळत असल्यामुळे बोलावं लागतं, पण काही झालं नाही. उत्तम उदाहरण म्हणजे इथला खासदार त्याच्या विषयी बोलून मला तोंड खराब करायचं नाही. मी देशाचा जबाबदार मंत्री आहे, मला कामं आहेत. सगळ्या योजना लोकांमध्ये मला न्यायच्या आहेत. औद्योगिक क्रांती मला करायची आहे. काही लोक मला विचलित करून पाहतायत, मी तस होऊ देणार नाही, असं राणे म्हणाले.
Read Also :
- राज्यात कायद्याचं राज्य आहे, मग अनिल परब यांना स्वत:हून अटक करा – चंद्रकांत पाटील
- महामारी नियमांचं पालन करुन राष्टवादी अध्यक्ष शरद पवार करणार राज्याचा दौरा
- मी न घाबरणारा मराठा! छोटेखानी भाषणात ऍड. उज्ज्वल निकम यांचे उद्गार
- राजनाथ सिंग यांचे महाराजांवरचे ‘ते’ वक्तव्य वादात, कोल्हेंकडून निषेध तर संभाजी ब्रिगेडची माफीची मागणी
- ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले