मुंबई : सर्वोच्च न्यायालयात ५ मे रोजी, मराठा आरक्षणाचा तत्कालीन राज्य सरकारने केलेला कायदा रद्द झाल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच, या निर्णयानंतर छत्रपती संभाजीराजे देखील प्रचंड आक्रमक झाले असून, त्यांनी राज्यभर दौरा सुरु केला. सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांनी, मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे आणि हा मुद्दा कसा महत्वाचा आहे ही बाब या नेत्यांच्या कानावर घातली.
दरम्यान, आज त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. यावेळी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “मी देवेंद्रजींना बोललो, आपल्याला मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल, तर आपण राजकारणा पुढे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते आणि सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे या सर्वांनी एकत्र यायला हवं,” असं त्यांनी सांगितलं.
तसेच, “मी नम्रतेने हात जोडून त्यांना विनंती केली. तुझं-माझं न करता आपण समाजासाठी एकत्र येऊ. मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ. त्यांना न्याय दिला नाही, तर या समाजाचं काय होईल? याला जबाबदार माझ्यासकट आपण सगळे नेते मंडळी, खासदार, आमदार असतील”, असं म्हणत त्यांनी पुन्हा सगळ्या नेत्यांना एकत्र येण्यासाठी साद घातली.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्याप्रकारे भाजप आणि पंतप्रधान हाताळत आहेत, त्यावरून त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही दिवसांपासून ते भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दुसरीकडे, भाजपकडून देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली असून, त्यामुळे ते आज संध्याकाळी ५ वाजताच्या बैठकीत पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Read Also :
- ‘भाजपला सोडचिट्ठी देणार, की थेट नवा पक्षचं काढणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आज
- इयत्ता १० वीचा फॉर्म्युला ठरला.! नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
- ठाकरे सरकार राज्यातला लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवणार!
- पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?
- चंद्रकांत पाटलांना स्वप्नं बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?