मुंबई : आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. दोन वर्षानंतर कोरोनाची साथ नियंत्रणात आली असून यावर्षी राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षीचे सगळेच सण मोठ्या उत्साहात साजरे करा. आजपासून महाराष्ट्राच्या विकासाचा श्रीगणेशा करूयात, असं आवाहन केलं आहे.
“गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथील निवासस्थानी गणपती मुर्तीची स्थापना करत पुजा केली. परंपरेनुसार मुख्यमंत्री गणपतीची स्थापना वर्षा बंगल्यावर करण्यात येते. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर आले. तसेच आगामी काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री देखील मुंबईत गणपतीची आरती करण्यासाठी येणार आहेत.
“आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमन घराघरात होतंय. दोन वर्षापासून कायम असलेलं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करूया. गणपती देवता आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रर्थना मी करतो. महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा आपण संकल्प करूयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
“आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सामाजिक भान जपणं आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशमंडळांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करावी, अस आवाहन गणेशभक्तांना करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा दृढ संकल्प मी केलाय. तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ हवी आहे. कोरोनामुळे मंदावलेली विकासाची गती पुन्हा गाठायची आहे. कितीही आव्हानं आली तरी तमा बाळगायची नाही. मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेत, हा गणेशोत्सव धुमधडाक्यात सजरा करूयात,असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Read also
- “एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट
- “एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”
- “शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
- “संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन
- “शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”