मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आज मुंबईतील बीकेसी मैदानात त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेत ते काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातील, देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेलं मळभ, धुकं, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होणार आहे. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसून येईल. अर्थात हे राज्य आणि शिवसेना पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर पुढे जात आहे. शिवसेनाप्रमुखांची प्रेरणा आहे. काही लोकं राज्यातील सलोख्याचे वातावरण बिघडणवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही पोटदुखी आहे, जळजळ आहे त्यावर उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील. कोणाचा बुस्टर डोस माहीत नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. विरोधकांना करारा जबाब मिळणार आहे. आमची फटकेबाजी असते. प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो, असे संजय राऊत म्हणाले.
फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
आजच्या सभेचे व्यासपीठ बघाल तर एवढे मोठे व्यासपीठ मुंबईत निर्माण झाले नव्हते. भव्य असे व्यासपीठ असणार आहे. शिवसेनेचा कारभार भव्य असतोच. मैदानात उतरण्याच्या निश्चियाने, जिद्दीने उतरण्यासाठी सभेचे आयोजन केले गेले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची शिवसैनिक वाट बघत होते. दोन वर्षात उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला. बैठका घेतल्या. पण जाहीर सभा प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. शिवसेना आणि गर्दी यांचे अतूट नाते आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेबांचा विचार, राज्याचा विचार, विकासाचा विचार या विचाराचं लोहचुंबक आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबच आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सभेला लोक आपोआप गर्दी करतात.उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्राला आणि देशाला लागून आहे. या सभेतून विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळेल, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, आज नक्की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- “विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
- केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
- केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;
- “देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे”
- अखेर राज ठाकरेंच्या सुरक्षितेत वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय