मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सरकारने जाहीर केलेल्या पोलिस भरती, मराठा आरक्षण तसंच आरक्षणावरील यापुढची होणारी सुनावणी अशा महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीला आमदार विनायक मेटे, बाबासाहेब पाटील, राजन घाग, ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आदी नेते उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्यशासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, पोलीस भरती प्रक्रियेत इडब्ल्यूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचा कुठेही उल्लेख नव्हता. यावर विनायक मेटे यांनी आक्षेप घेतल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.
Read Also :
- विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने नितीन राऊत, मुकुल वासनिक यांना दिली महत्त्वाची जबाबदारी
- चर्चेआधी शेतकऱ्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, आजच्या बैठकीत तोडगा निघणार ?
- नाशिकमधील भाजपचे मोठे नेते सेनेच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
- ‘ही तर ठाकरे सरकारची रोजचीच बोंबाबोंब’, फडणवीसांचे टीकास्त्र
- हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी
- प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात येणार ? म्हणाले…