मुंबई : राज्यात राजकीय मैदानात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बारीक नजर असते. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेवर ते विरोधकांवर टीका आणि सत्तेतल्या आपल्या घटक पक्षांच्या नेत्यांवर आणि मंत्रयांवर अचूक आणि सूचक असं भाष्य करत असतात. याचा परत एकदा प्रत्यय, आज साताऱ्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या, ई-भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी आला.
हे पण वाचा, भाजपाला कधीपासून ओबीसींचा कळवळा? जेव्हा त्यांचे नेतृत्व संपवले तेव्हा हा कळवळा कुठे होता?
या कार्यक्रमाला, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदींची उपस्थिती हाेती. यावेळी, अजित पवारांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीला दिलेल्या रंगावरुन नापसंती व्यक्त केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रंगाच्या मुद्द्यावरुनच विरोधकांना टोला लगावला आहे.
हे पण वाचा, “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, त्यांच्या हस्ते इमारतींचं उद्घाटन व्हावं आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहता यावं, असंच नियतीच्या मनात असावं. कदाचित त्यामुळेच पोलीस ठाण्याचं काम लांबलं असावं. असो, ‘देर आये दुरूस्त आये’. चांगल्या कामाची सुरूवात होतेय ही आनंदाची बाब आहे. मात्र, ही कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. मला इमारतीच्या पोलीस ठाण्याचा रंग आवडलेला नाही. पिवळा पट्टा आणि निळा पट्टा. ते एकदम बेकार दिसतं. काम पूर्ण होईल, तेव्हा आता याला चांगल्या पद्धतीने पुन्हा रंग देऊ. इमारत उठावदार दिसेल,” असं अजित पवार म्हणाले.
हे पण वाचा, आमची घरे तोडली.., आमच्या माणसांना पोलिस मारतायं.., आम्ही कुठे जायचं..- चिमुकला
हाच धागा पकड्तर मुख्यमंत्र्यांनी, “अजितदादा इमारतीच्या रंगाबद्दल बोलले, हे ऐकून मला बरं वाटलं. मला वाटत होतं, की राजकारण आणि कला यांची सांगड घालणारा मी एकटाच कलाकार आहे. सध्या माझी सगळी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे. मात्र आत्ता राजकारणात जे काही समोर दिसत आहे, त्यात अनेकजण अनेक रंग दाखवत आहेत. त्यांचे रंग बघावे लागतात आणि ते बदलण्याचं धाडस असावं लागतं, असं धाडस या सरकारमध्ये आहे. नाहीतर लोक नुसते रंग दाखवतात आणि आपण आपले बसलोय बघत, याला काही अर्थ नाही. एखादा रंग नाही आवडला, तर तो रंग बदलण्याचं धाडस आपल्या सरकारमध्ये आहे”, असं वक्तव्य करत तयांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
Read Also :
- कोरोनाची तिसरी लाट: घाई घाई ने निर्बंध शिथिल करू नका – उद्धव ठाकरे
- पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कडून स्थगिती
- “महाराष्ट्रात जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का?”, फडणवीस ठाकरे सरकारवर गरजले
- परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
- आंबिल ओढा कारवाईला सत्ताधारी भाजपच जबाबदार; खासदार वंदना चव्हाण संतापल्या