अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून एका प्रभागात महापालिकेची पोटनिवडणूक होत आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अजूनपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत निर्णय झालेला नाही. आज दुपारपर्यंत जर तिढा असाच कायम राहिला तर, महाविकास आघाडीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात दिसतील. माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कर्जतमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहे.
कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना युती-महायुतीचा घोळ अजूनही कायम आहे. पक्षनेतृत्व व इच्छुक आपले पत्ते उघडत नसल्याने राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
“सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते”
आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीत महाविकास आघाडी करून जनतेच्या हितासाठी पॅनल उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सन्मानाने अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. भाजपाला शहरात चेहरा नाही. माजी मंत्री राम शिंदे ते खासदार डॉ. सुजय विखे-पाटील व त्यांच्या समर्थकांना एकाकी लढावे लागणार आहे. विखे समर्थक असलेले जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ हे भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतींना गैरहजर राहिले. यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. कर्जतमध्ये सोय आणि तोडगा हा कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार निश्चित करताना विविध पक्षांच्या नेतृत्वाला किंवा प्रमुखांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरून लोकांनी खासदार अमोल कोल्हेंना झापलं..
दरम्यान, गेल्या नगरपंचायत निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेली राष्ट्रवादी आता प्लसमध्ये आहे. आमदार पवार यांनी भाजपात भगदाड पाडून जोरदार इन्कमिंग केले. प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत आणि नगरसेविका उषा राऊत यांनी भाजपाला रामराम केले. विकासकामांच्या माध्यमातून पवारांनी पक्षात फिलगुड वातावरण निर्माण केले आहे. निवडणुकीतील अनेक सक्रिय नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याची जाणीव भाजपाला नक्की होईल. विरोधी पक्षात असतानाही काँग्रेसने गेल्या निवडणुकीत चार जागा जिंकून आपले अस्तित्व टिकवले होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले काय भूमिका घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, तालुकाध्यक्ष बळीराम यादव यांच्यावर शिवसेनेची मदार आहे. महाविकास आघाडी होणार की खिचडी? हे लक्षात घेत भाजपासाठी बंडखोरी डोकेदुखी ठरेल, असे वातावरण सध्या राजकीय वर्तुळात आहे.
Read Also :
- चैत्यभूमीबाहेर ऑल इंडिया पँथरच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांची तात्काळ कारवाई
- खडसे vs महाजन; आगामी निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…