मुंबई – अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं राजकीय नेत्यांकडून स्वागत केले जात आहे तसेच या शर्यतीच्या सुनावणीदरम्यान पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. आमदार महेशदादा लांडगे यांच्या या प्रयत्नांचे भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील कौतुक केले आहे.
राजकारण महाराष्ट्राचे : भाजपाच्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच रुपाली पाटलांचा प्रवेश
“महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या जिव्हाळ्याची बैलगाडाशर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या११ वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळालयं या लढ्याचे नेतृत्व करणारे आमदार महेश लांडगे तसेच सर्व बैलगाडाप्रेमी राज्यातील शेतकरी या लढ्यात सहभागी प्रत्येकाचे अभिनंदन..” असे ट्विट करत चित्र वाघ यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे.
महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या जिव्हाळ्याची बैलगाडाशर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या११ वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळालयं
या लढ्याचे नेतृत्व करणारे आ॰@maheshklandge तसेच सर्व बैलगाडाप्रेमी राज्यातील शेतकरी या लढ्यात सहभागी प्रत्येकाचे अभिनंदन..👍
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 16, 2021
दरम्यान, महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीची प्राचीन परंपरा आहेच मात्र तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अतिशय आवडीचा छंद म्हणून या शर्यतींकडे पाहिलं जातं मात्र हायकोर्टाने या शर्यतींवरती बंदी घातल्यापासून शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे आणि त्यामुळेच बैलगाडा मालक आणि राज्य सरकारवर या शर्यती सुरु करण्यासाठी विनंती आणि दबाव आणत होते. राज्यातील बैलगाडा शर्यंतींवरील बंदी हटवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली.
भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात
शासनाने दि. १५ जुलै २०११ च्या परीपत्रकानुसार बैलाचे वर्गीकरण जंगली प्राण्यांमध्ये केले आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडी शर्यत पूर्ण बंद झाले होते. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती सशर्त सुरू करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायदा केलेला आहे. परंतु, या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. मुंबई हायकोर्टाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमदार महेश दादा लांडगे यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केल्याने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला न्याय मिळाला आहे.
Read Also :
- “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळेच बैलगाडा शर्यत परत सुरू”; योगेश टिळकर यांनी केले कौतुक
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव