मुंबई : मुळात मी सामना वाचत नसल्याचं मी अनेकदा सांगितलं आहे. काॅंग्रेस एक विचार आहे. असे अनेक आले आणि गेलेत. काॅंग्रेसने अनेकदा स्वातंत्र्याच्या लढाईत किंवा अशा अनेक घटनांमध्ये स्वत: ला झोकून देऊन काम केलं आहे. आज राजीव गांधी यांचा स्मरण दिवस आहे. राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. ज्यांना बलिदानचं कळत नाही त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही, असा घणाघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेवर लगावला आहे. सामनामधून केलेल्या टिकेवर ते बोलत होते.
अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
काॅंग्रेसच्या उदयपुर येथी चिंतन शिबीरात अनेक प्रश्न अधंतरी त्यामुळे राज्य राज्यातील काॅंग्रेस नेत्यांची काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. 2024 मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप वेगळ्या पद्धतीची तयारी करीत आहेत. मात्र काॅंग्रेसचा सध्या गळती हंगाम सुरू आहे. काॅंग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. देशासाठी हे चित्र बरं नाही. असल्याची टिका शिवसेनेने सामनामधून केली आहे.
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
देशाला 21 व्या शतकात नेण्याचं स्वप्न ऱाजीव गांधी यांनी पाहिलं. आजच्या तरूणांच्या हातात संपुर्ण जग मुठ्ठीत राहावं. हे स्वप्न राजीव गांधी यांनी पाहिलं होतं. भाजपच्या काळात सध्या 45 कोटी तरुणांनी नोकरींची आस सोडून दिली आहे. अडीच कोटी तरूणांच्या नोकऱ्या नाहीशा करून टाकल्या आहेत. लोकांच्या संपत्त्या दररोज विकल्या जात आहेत. त्यांच्यावर अग्रलेख लिहण्याची गरज आहे. मात्र ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांच्याबद्दल काॅंग्रेसला काहीही बोलायचं नाही, असा टोला देखील नाना पटोले यांनी शिवसेनेला लगावला.
Read also:
- राज ठाकरेंच्या सभेचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज ; करारा जवाब मिलेगा…
- “छत्रपती संभाजीराजेंसमोर अटी, शर्टी ठेवणं योग्य नाही”; प्रवीण दरेकरांनी शिवसेनेला सुनावलं
- “मुंडे साहेबाचं स्वप्न महाविकास आघाडी सरकारमध्ये पुर्ण करता आलं”; धनंजय मुंडे
- “हा जमलेला महासागर सांगतो की शेतकऱ्यांना या मुर्दाड सरकारविरोधात चीड”
- नवाब मलिक प्रकरणांवरून फडणीस संतापले; म्हणाले.. की, जेवढा अट्टाहास मलिकांना वाचवण्यासाठी…;