मुंबई : नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यापाठीमागे देखील त्यांचाच हात असल्याचा आरोप शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी कधी ऐकलेलं नाही. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई कशासाठी ?
राष्ट्रवादीमध्ये असताना शरद पवार यांनी आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? तर बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे? असंही दिपक केसरकर म्हणाले.
“राज्यात मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान”
जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही, असं शरद पवारांनी मला सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. असंही ते म्हणाले.
कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
दरम्यान, आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. परंतु बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं. की शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं”
- किती दिवस फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; चित्रा वाघ म्हणाल्या…;
- “एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती
- “सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार