मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारानंतरही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस आघाडीवर असून काॅंग्रेसने या निवडणुकीत बहूमताच्या दिशेने आगेकुच केली आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का असून कर्नाटक राज्य भाजपच्या हातून सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…१०० कोटी प्रकरणातील परमबीर सिंहंचं निलंबन मागे घेण्याचं फडणवीसांनी सांगितलं कारण
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ पैकी २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी काॅंग्रेस १२० जागांवर आघाडीवर असून भाजप ७२ आणि जेडीएस २५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे या निवडणुकीत काॅंग्रेसकडून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात येत असून काॅंग्रेसच्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी हालवण्यात येत असल्याचीही माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकविधानसभा निवडणुकीसाठी तब्बल १९ जाहीर सभा घेतल्या होत्या. तर ७ मोठ मोठे रोड शो देखील केले. तर २९ मार्चनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे ७ दौरे केले होते. यात या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या तब्बल २०६ जाहीर सभा झाल्या होत्या. तरी देखील या निवडणुकीत भाजपचा पराभव होतांना दिसत आहे.
हेही वाचा…“..तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही अडचणीत येऊ शकतो,” संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच चर्चा*
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी भाषिक असलेल्या एकून १९ मतदारसंघासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांनी प्रचार केला होता. यामध्ये राष्ट्रवादीने ९ उमेदवार दिले होते. यामध्ये निपाणीत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या उत्तम राव पाटील यांच्यासाठी प्रचार केला होता. तर निपाणीत भाजपने देखील यावरून शरद पवारांना डिवचलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे उत्तमराव पाटील आघाडीवर आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचाकर्नाटकात भाजपचा सुपडा साफ..!मोदी-शाहांना जनतेने झिडकारलं, काॅंग्रेस बहुमताच्या दिशेने
हेही वाचा…पुण्यात भरदिवसा हत्या..! राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल, परिसरात हळहळ व्यक्त
हेही वाचा…काॅंग्रेसचे दोन्ही नेते आपांसात भिडले, पटोले- वडेट्टीवार मधील ‘ते’ प्रकरण कारणीभूत
हेही वाचा…समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, आघाडीच्या काळातील ‘दोन’ प्रकरणात आज मोठी घडामोड
हेही वाचा…“तर शरद पवार पंतप्रधान झाले असते, आजही परिस्थिती बदलली तर ते होऊ शकतात, “