मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दोन प्रकरणात आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. १०० कोटी प्रकरणातील मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. तर आर्यन खान प्रकरणात पोलीस अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण गरमागरमीचं झालं आहे.
हेही वाचा…100 कोटी वसुली प्रकरण..! शिंदे सरकारचा ‘परमबीर सिंह’ ला मोठा दिलासा, आघाडीचा तो निर्णय मागे
आज राज्याच्या गृहविभागाने नोटीस काढून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेत असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंह यांनी तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुल करण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. याच दरम्यान सचीन वाझे प्रकरण चर्चेत आलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अन् अनिल देशमुख यांना अटक झाली होती.
हेही वाचा…“दादा तुम्ही आमचे, तुम्ही आम्हाला पारखं करू नये”, अजित पवारांनी सुनावल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार असतांना आर्यन खान प्रकरणात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. त्यानंतर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक असा वाद निर्माण झाला होता. पुढे नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरूंगात जावं लागलं. तर समीर वानखेडे यांना त्यावेळी मोठा दिलासा मिळाला होता.
हेही वाचा…“सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं”, अजित पवारांचा पलटवार
दरम्यान, आज समीर वानखेडे यांच्या मुंबईबरोबरच दिल्ली आणि रांचीसह देशभरात २९ ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू केली आहे. समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यासंदर्भातच त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी छापेमारी सुरू करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…“तर शरद पवार पंतप्रधान झाले असते, आजही परिस्थिती बदलली तर ते होऊ शकतात, “
हेही वाचा…१०० कोटी प्रकरणातील परमबीर सिंहंचं निलंबन मागे घेण्याचं फडणवीसांनी सांगितलं कारण
हेही वाचा…“..तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही अडचणीत येऊ शकतो,” संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच चर्चा*
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”
हेही वाचा…“ज्यांना १७ दारं फिरूनही कुत्र विचारत नाही, त्यांनी नैतिकता शिकवू नये,” दानवेंचा राणेंना जोरदार प्रत्युत्तर