मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आता राज्यात नैतिकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. माझ्यात नैतिकता होती म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता तुमच्यात नैतिकता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर पलटवार केला. त्यानंतर जोरदार टिका टिप्पणी होत आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा…“निकाल ठाकरेंच्या विरोधात, पण अजित पवारांनी पटोलेंवर हात धुवून घेतले”, एकच चर्चा
इतक्या मोठ्या पदाचा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नैतिकता नाही तर मग काय आहे. आपल्या जीवाभावाच्या रक्ताच्या माणसं सोडून गेल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी नाहीतर सत्ता शिवसेनेसाठी आहे. अस अंबादास दानवे म्हणाले.
हेही वाचा…जंयत पाटलांना इडीची नोटीस, राज ठाकरेंनाही त्याच कंपनीसंबंधी आली होती नोटीस, ‘ती’ कंपनी कोणती ?
ज्यांनी पहाटे राष्ट्रवादीसोबत शपथ घेतली त्यांनी नैतिकता आम्हाला शिकवू नये. नितीश कुमार, मेहमुब्बा मुक्तीसोबत सरकार स्थापन केलं. मग तुमची ही कोणती नैतिकता होती. तसेच ज्यांनी १७ दारं फिरली आहेत. त्यांना कुत्र विचारत नाही. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. अशी टिका त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे. काल पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी ठाकरेंवर जहरी टिका केली होती.
READ ALSO :
हेही वाचा…100 कोटी वसुली प्रकरण..! शिंदे सरकारचा ‘परमबीर सिंह’ ला मोठा दिलासा, आघाडीचा तो निर्णय मागे
हेही वाचा…“दादा तुम्ही आमचे, तुम्ही आम्हाला पारखं करू नये”, अजित पवारांनी सुनावल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं”, अजित पवारांचा पलटवार
हेही वाचा…निवडणुकांचा बिगूल…. “राष्ट्रवादीने याचिका मागे घेतल्यास लगेच महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील”
हेही वाचा…कोश्यारी गेले, बैस आले, पण, त्या ‘१२’ आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा मोठा निर्णय