मुंबई : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालाबाबत मोठ्या घडामोडी होत असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना इडीची नोटीस आल्याने एकच चर्चा रंगली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मागे घेतल्याच्या वेळी जयंत पाटील चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांना आता चौकशीसाठी ईडीने बोलवले आहे. त्यावर आता जंयत पाटील यांनी इडीकडे वेळ मागितला आहे.
हेही वाचा…“लोकशाही वाचवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज”, शरद पवार
आयएल अॅण्ड एफएस या कंपनीत गैरव्यवहार झाल्याचा इडीने ठपका ठेवला आहे. त्यानंतर या कंपनीच्या संबंधीत सगळ्यांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कंपनीच्या संबंधी २०१९ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता जंयत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी येत्याा १२ मे रोजी बोलवलं आहे. पंरतु खासगी काम असल्याने जयंत पाटील यांनी इडीकडून चौकशीसाठी वेळ मागवून घेतला आहे.
हेही वाचा…“न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा”
आयएल अॅण्ड एफएस या संस्थेशी माझा कोणताही संबध नाही. त्यांच्याकडे कधी कर्ज मागण्यासाठी गेलेलो नाही. आता नोटीस प्राप्त झाली आहे. तर चौकशीला सामोरा जाईन. पण सध्या जवळच्या लोकांची लग्न आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी चौकशीसाठी येईनल असे पत्र ईडीला पाठविले आहे. ईडी नोटीस का पाठवते? हे देशाला माहिती आहे. त्यामुळे आत्ताच नोटीस का आली ? याचे मला आश्वार्च वाटत नाही. मला का लक्ष्य करण्यात आले? हे समजत नाही. अशीही प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, पुण्यातील ‘ही’ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत
हेही वाचा…शिवसेना नेमकी कुणाची? कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे टाकला चेंडू, काय घडणार, काय होणार ?
हेही वाचा…“सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल”, निकालानंतर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया
हेही वाचा….“माझ्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केल्याने मित्र नाराज झालेत”, शरद पवारांचं वक्तव्य
हेही वाचा…आता ठरलंच..! शिंदे- भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संपु्र्ण विस्तार होणार ?