मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश धंनजंय चंद्रचुड यांनी कोर्टात वाचून दाखवला. या प्रकरणातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे कोर्टाने सोपवला. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल, उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेचा फडणवीसांनी पाठ वाचला, ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील काही मुद्यांमध्ये कोर्टाने साधारपणे जे राज्यकर्ते आहेत. त्यांच्यासंबंधीची तीव्र भूमिका मांडली. या निकालात विधिमंडळ पक्ष मान्य नसून जो राजकीय पक्ष आहे. त्याचा आदेश अत्यंत महत्वाचा आहे. काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा विषय सोपवण्यात आला आहे. हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी सुप्रीम कोर्टोची अपेक्षा असल्याचं शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…“मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला, आता मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,” उद्धव ठाकरे
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष त्यांची भूमिका घेतील तेव्हा त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष हे इन्स्टिट्युशनल पद आहे. या पदाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी या पदाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी. अपेक्षा आहे. इन्स्टिट्युशनसंबंधी या लोकांमध्ये किती आस्था आहे. हे उद्या त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल. असंही शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…सत्तासंघर्ष निकाल..! “भगतसिंह कोश्यारींचे सर्व निर्णय चुकीचे, कोर्टाने राज्यपालांना जोरदार फटकारले”
दरम्यान, माझ्या पुस्तकात मी याबाबत स्पष्टपणे लिखान केल्याने आमचे मित्र नाराजही झाले. पण त्यामागे नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती. आज सुप्रीम कोर्टाने तीच गोष्ट व्यक्त केली. मात्र झाल्या त्या गोष्टी झाल्या. आता आम्ही उद्धव ठाकरे, काॅग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरूवात करू. असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. शरद पवारांनी लोक माझी सांगती या पुस्तकात याचा उल्लेख केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…आता ठरलंच..! शिंदे- भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संपु्र्ण विस्तार होणार ?
हेही वाचा…“लोकशाही वाचवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज”, शरद पवार
हेही वाचा…“न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा”
हेही वाचा…कोश्यारींना कोर्टाने फटकारले, भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
हेही वाचा….“शिंदे सरकार वाचलं, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो”, जंयत पाटलांनी घेतला शिंदेंचा चिमटा