मुंबई : गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील सात घटनापीठांच्या न्यायाधीशांकडे देण्यात आला. सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी महाराष्टाच्या सत्तासंघर्षाचा निकाल वाचून दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचं प्रतोदपद बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. तर मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करू शकत नाही. असंही सरन्यायाधीस धनंजय चंद्रचुड यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी शिंदे सरकार जरी वाचलं तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे म्हटलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात ‘या’ पाच न्यायमुर्तींची महत्वाची भूमिका , वाचा संपु्र्ण यादी
भरत गोगावले यांचा व्हिप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैश ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्दांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही. शिंदे सरकार वाचल हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसे बसे शिंदे सरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेचे पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितले असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. “
राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते. तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले यावर जंयत पाटलांनी सांगितलं की, राज्यपालांना जसा माणुस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. राज्यपाल स्थरावरील व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नसले तरीही त्यांची चोवीस तास अशीच भूमिका होती. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचं सरकार घालवण्यासाठई राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला असा आरोपही पाटलांनी केला.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, अन् तेच आमचे नेते,” निकालाआधी फडणवीसांची प्रतिक्रिया
राज्यातील सरकार बे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाल्याने राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्वाचे नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती. त्याला अधिकची शक्ती मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त अन्यायकारक होईल असे वाटते. ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले. त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत. मात्र त्यांनी काय करावे हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असंही जंयत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल, उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेचा फडणवीसांनी पाठ वाचला, ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला, आता मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,” उद्धव ठाकरे
हेही वाचा…सत्तासंघर्ष निकाल..! “भगतसिंह कोश्यारींचे सर्व निर्णय चुकीचे, कोर्टाने राज्यपालांना जोरदार फटकारले”
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे, कोर्टाचा मोठा निकाल, निकालात शिंदेंना झटके, ठाकरेंना दिलासा
हेही वाचा…..एकनाथ शिंदेंना कोर्टाचा पहिला मोठा धक्का, भरत गोगावलेंचं प्रतोदपद बेकायदेशीर, सुप्रीम कोर्ट