मुंबई : भाजपसोबत निवडणुक आलात अन् राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत गेलात. तेव्हा तुम्ही तुमची नैतिकता कोणत्या डब्ब्यामध्ये बंद करून ठेवली होती. त्याचं पहिलं उत्तर द्या. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी विचार सोडली अन् एकनाथ शिंदे यांनी विचारांसाठी खुर्ची सोडली. एकनाथ शिंदे सत्तेसोबत होते. अन् ते विरोधी पक्षात आमच्यासोबत आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे क्रमप्राप्त ठरत नाही. असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या नैतिकेचा चांगलाच समाचार घेतला.
हेही वाचा…“काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. “
पुढे बोलतांना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा राज्यापालांचा निर्णय योग्य होता असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे आधी काही लोकांना शंका होती, त्याचं समाधान न्यायालयाने केलं असावं. अर्थाच ते सर्वाच्च न्यायालयाला मानत असतील तर त्यांच्या शंकेचं समाधान झालं असेल. सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की, अध्यक्ष आणि निवडणुक आयोगाला त्यांच्यासमोर येणाऱ्या मुद्यांवर निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार आहे. त्यामुळे पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार निवडणुक आयोगाला आहे, हेही न्यायालयानं स्पष्ट केलं असल्याचं फडणवीसांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, अन् तेच आमचे नेते,” निकालाआधी फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, सगळं घेऊनही त्यांनी माझ्या पाठीत वार करावा आणि माझ्यावर अविश्वास आणावा हे मला मान्य नाही. विश्वासघात करणाऱ्यांकडून माझ्यावर अविश्वासदर्शक ठराव यावा हे मला मान्य आहे. माझ्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकता समोर ठेवून घेतला होता. आताच्या मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर आता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कायद्यानुसार मी दिलेला राजीनामा चुकीचा ठरू शकतो. पण नैतिकतेचा विचार करता ज्या लोकांना माझ्या पक्षानं सर्वकाही दिलं, त्यांनी गद्दारी केली आणि मग त्यांनी माझ्यावर अविश्वास आणला तर त्याचा मी सामना का आणि कसा करू? महाराष्ट्रात तर आता सरकारच नाहीये. असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला, आता मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,” उद्धव ठाकरे
हेही वाचा…सत्तासंघर्ष निकाल..! “भगतसिंह कोश्यारींचे सर्व निर्णय चुकीचे, कोर्टाने राज्यपालांना जोरदार फटकारले”
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे, कोर्टाचा मोठा निकाल, निकालात शिंदेंना झटके, ठाकरेंना दिलासा
हेही वाचा…..एकनाथ शिंदेंना कोर्टाचा पहिला मोठा धक्का, भरत गोगावलेंचं प्रतोदपद बेकायदेशीर, सुप्रीम कोर्ट