मुंबई : महाराष्टाच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा निकालाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला जात आहे. यातच आज खासदार संजय राऊत यांनी एक खोचक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्याची शक्यता कायदेतज्ञांनी व्यक्त केली आहे. हे प्रकरण ज्यावेळी घडलं त्या वेळी विधानसभा अध्यक्षांचा कारभार उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे होता. त्याच पार्श्वभूमीवर राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवाळ असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने १६ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे आता या १६ आमदारांचं भविष्य आज सर्वोच्च न्यायालयात टांगलीणा लागलं आहे. जर हे १६ आमदार अपात्र ठरले तर शिंदे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. कारण या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.
काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..
जय महाराष्ट्र!
😄😄 https://t.co/PQqCmfWpj8— Sanjay Raut (@rautsanjay61) May 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, अन् तेच आमचे नेते,” निकालाआधी फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हे यांची महापालिका भेट; पण पदाधिकाऱ्यांविनाच! शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
हेही वाचा…..महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल..! निकालानंतर काय होऊ शकतं, काय घडू शकतं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?