मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एक ते दोन दिवसात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा दोन्ही गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…..“सडक्या मेंदुच्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय”,फडणवीसांची आव्हाडांवर जहरी टिका
सर्वोच्च न्यायलयातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाआधी काही राजकीय आणि पत्रकारांनी निकाल देऊन टाकला आहे. त्यानंतर पुढे त्या निकालावर त्यांनी सरकार देखील बनवून टाकलं आहे. हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे मोठी कोर्ट आहे. शांतपणे निकालाची वाट पाहावी, आम्ही पुर्णपणे आशादायी आहोत. काही होणार नाही, आम्ही सर्व कायदेशीर केलं आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते,” ‘रडरागिणी’ म्हणत मिटकरींचा अंधारेंवर हल्लाबोल
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तर हा निकाल सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे दिला जाऊ शकतो. असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
हेही वाचा…“नार्वेकर तुम्ही अगोदर पदाचा राजीनामा द्या, अपात्रतेचा निर्णय झिरवळांना घेऊ द्या”