मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एक ते दोन दिवसात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा दोन्ही गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. यातच निकाल लागण्याआधी महाविकास आघाडीतील अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
हेही वाचा…“रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते,” ‘रडरागिणी’ म्हणत मिटकरींचा अंधारेंवर हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यातली काही लोकं, राष्ट्रवादी काॅंग्रेसमधली काही लोकं काॅंग्रेसची देखील काही लोकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष दिल्यानंतर किंवा महाविकास आघाडी केल्यानंतर काय हाल झाले हे त्यांनी तपासून पाहावे. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे आता उरलेसुरले आमदार देखील राहणार नाहीत. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…Karnataka Election 2023..! “कर्नाटकात मोदी अन् शहांनी घाम अन् पैसा गाळूनही त्यांचा पराभव होईल”
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या ११ किंवा १२ तारखेला लागण्याची शक्यता आहे. कारण आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर येत्या १५ तारखेला पाच न्यायधीश घटनापीठातील न्यायधीश एम. शहा निवृत्व होत आहे. त्यामुळे त्याआधी निकाल लागणे अपेक्षित असून त्याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
हेही वाचा…“नार्वेकर तुम्ही अगोदर पदाचा राजीनामा द्या, अपात्रतेचा निर्णय झिरवळांना घेऊ द्या”
हेही वाचा…..“सडक्या मेंदुच्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय”,फडणवीसांची आव्हाडांवर जहरी टिका