मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या, असं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. आव्हाड यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“निवडणुकीत अजित पवारांचा हात लागतो, नाहीतर ती जिंकता येत नाही”,अमोल कोल्हेंनी केले पवारांचं कौतुक
चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्हामध्ये म्हटलं आहे की द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली. माझा प्रश्न असा आहे की कुरूलकर या अतिशय महत्त्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे. असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आम्हाला शुन्यातून सुरूवात करायचीय, म्हणून, आम्ही आता… ” शरद पवारांनी केलं मोठं विधान, एकच चर्चा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कुरूलकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही. किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आंतकवादाला धर्म, जात पंथ, राज्य राष्ट्र नसते. हे यावरून तरी आपल्या लक्षात येईल. कुरूलकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला. नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरूलकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरूलकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल. ? याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आता मात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेऊन आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली. माझा प्रश्न असा आहे की, कुरुलकर या अतिशय महत्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या… pic.twitter.com/4xzAkExVpN
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
हेही वाचा…“नार्वेकर तुम्ही अगोदर पदाचा राजीनामा द्या, अपात्रतेचा निर्णय झिरवळांना घेऊ द्या”
हेही वाचा…..“सडक्या मेंदुच्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय”,फडणवीसांची आव्हाडांवर जहरी टिका
हेही वाचा…“रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते,” ‘रडरागिणी’ म्हणत मिटकरींचा अंधारेंवर हल्लाबोल
हेही वाचा…Karnataka Election 2023..! “कर्नाटकात मोदी अन् शहांनी घाम अन् पैसा गाळूनही त्यांचा पराभव होईल”