पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीत नेत्यांची चढाओढ बघायला मिळत आहेत. यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पोस्टर्स देखील बघायला मिळाले. यातच आता जयंत पाटलांना भावी मुख्यमंत्री म्हणून म्हणणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
हेही वाचा…“अनेकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचे चॉकलेट पुन्हा दाखवण्यात येतील”
पिंपरी-चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत आयोजित केली होती. त्या मुलाखतीत अजित पवारांबाबत अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार असून यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. एकीकडे त्यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूक लढवत होता. तर दुसरीकडे मी शिरूर लोकसभा लढवत होतो. असे असताना मावळ आणि शिरूर लोकसभा अजित पवार यांनी हाताळली, स्वत: जातीने लक्ष घातले असं अमोल कोल्हे यांनी सांगितले.
हेही वाचा…..“अजित पवारांची हवी निघालीय, त्यांची ओळख त्यांच्या काकांमुळेच”
तर पुढे बोलतांना कोल्हे म्हणाले की, अजित पवारांनी या निवडणुकीसाठी अगदी मनपासून जातीने लक्ष घातले. अन्यथा २२ दिवसांत लोकसभेची निवडणूक चेहऱ्यावर जिंकता येत नाही. त्यासाठी अजित पवारांचा हात लागतो. तर आणि तरच निवडणुक जिंकता येते. असंही कोल्हे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“आम्हाला शुन्यातून सुरूवात करायचीय, म्हणून, आम्ही आता… ” शरद पवारांनी केलं मोठं विधान, एकच चर्चा
हेही वाचा…..“संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याचा आजार जडलाय”, संजय शिरसाठ
हेही वाचा…“शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार”, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सकाळचा भोंगा रोज बघतो, पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही”, श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टिका
हेही वाचा…“संजय राऊत आता शरद पवारांनंतर राहुल गांधींची चाकरी करताहेत”